अमृतमंथन

Icon

मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी माणसे…

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा! (ले० सलील कुळकर्णी)

(सूचना: अनेक वाचकांच्या आग्रही सल्ल्यानुसार या लेखाची इंग्रजी (भाषांतरित) आवृत्ती लवकरच तयार करण्याचे लेखक श्री० सलील कुळकर्णी यांनी योजले आहे.)

“मराठी भाषेला आणि मराठी माणसाला स्वत:च्या राज्यात न्याय्य अधिकाराचे व सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी सामान्य माणसाला देशाच्या भाषिक  धोरणांसंबंधीची कायदेशीर पार्श्वभूमी माहित असावी, या उद्देशाने मी हा लेख लिहीत आहे.

भारताच्या घटनेमध्ये कुठल्याही भाषेचा उल्लेख ‘राष्ट्रभाषा’ असा केलेला नाही. उलट घटनेच्या अनुसूची-८ मधील सर्वच भाषा या राष्ट्रभाषेच्या दर्जाच्या मानल्या जाव्यात असा अप्रत्यक्ष संकेत दिला आहे.”

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

आपले मित्र श्री० सलील कुळकर्णी, पुणे, यांचा लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे…

आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याचा मागोवा घेणे सुरस ठरेल.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , ,

’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)

गणपत्युत्सव, श्रीसत्यनारायणाची पूजा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या-प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचा हटकून समावेश असतोच; मग मधल्या इतर आरत्या व प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत. त्यामुळे प्रारंभीची ती आरती व शेवटची मंत्रपुष्पांजली या दोन्ही आपल्याला बर्‍यापैकी पाठ असतात. अर्थात मंत्रपुष्पांजलीचे शब्दोच्चार व तिची चाल हे दोन्ही आपण आपापल्या प्रामाणिक (गैर?)समजुतीप्रमाणे ठरवीत असतो, व आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या घरातील उच्चारपद्धती व चालच सर्वात योग्य आहेत अशी खात्री वाटत असते. मात्र अशा प्रकारे तोंडपाठ असणार्‍या त्यातील मंत्रपुष्पांजलीचा अर्थ मात्र आपल्याला दूरान्वयानेसुद्धा माहित नसतो आणि गंमत म्हणजे बालपणापासून उत्साहाने म्हटल्या जाणार्‍या या प्रार्थनेचा अर्थ न समजून घेताच आपण तिची बिनडोक घोकंपट्टी करून डोळे मिटून (शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेसुद्धा) ती प्रार्थना म्हणतो आहोत हे आपल्या गावीही नसते.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०८. संस्कृत भाषा, भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञान , , , , , , , , ,

विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो !!

उत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि हीच मंडळी आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यभाषेऐवजी एका परप्रांताच्या भाषेत (हिंदीत) शपथ घेण्याबद्दल आमच्याशीच दादागिरी करतात आणि आमचेच राज्यकर्ते त्यांची भलामण करतात. अर्थात असे सर्व केवळ आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

’मणभर कर्तृत्वाचा कणभर देश’ (ले० सुधीर जोगळेकर, लोकसत्ता)

भारताच्या मानाने इस्रायल हा खरोखरच चिमूटभर देश. विकिपीडियामधील माहितीप्रमाणे इस्रायलचे भौगोलिक क्षेत्रफळ हे सुमारे २२,०७२ चौरस कि०मी० म्हणजे भारताच्या ०.६७% आणि लोकसंख्या ७४,६५,००० म्हणजे भारताच्या ०.६२% आहे. म्हणजे भारत देश इस्रायलच्या दीडशे पटीहून अधिक मोठा आहे. मुंबईशी तुलना केल्यास इस्रायलचे क्षेत्रफळ मुंबईच्या सुमारे ३७ पट असून लोकसंख्या जेमतेम निम्मी (सुमारे ५४% ) आहे. अशा या चिमुकल्या पण अत्यंत स्वाभिमानी देशाचे अफाट कर्तृत्व पाहिले की कोणीही भारतीय आदराश्चर्याने चकित होऊन जाईल आणि त्याला स्वतःबद्दल न्यूनदंड वाटू लागेल.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , ,

हिंदीच्या वर्चस्वाविरुद्ध लढा (ले० आर० जगन्नाथन – डी०एन०ए०)

स्वातंत्र्यपूर्व अखंड हिंदुस्थानची राष्ट्रभाषा म्हणून संस्कृताधारित हिंदी भाषा निवडली होती.  स्वातंत्र्यलढ्याच्या काळात देशप्रेमाने भारावलेल्या वातावरणात संपूर्ण देशात हिंदीबद्दल राष्ट्रभाषा म्हणून ममत्वाची व आपुलकीची भावनाच होती. माझ्या ऐकीवाप्रमाणे अगदी मद्रास प्रांतातही काही हजार शाळांनी हिंदी विषय शिकवणे सुरू केले होते. पण स्वातंत्र्योत्तर काळात हिंदी राजकारण्यांनी जेव्हा जबरदस्तीने हिंदीचे वर्चस्व गाजवणे सुरू केले तेव्हा इतर हिंदीतर भाषक राज्ये बिथरली. आपल्या भाषेची पीछेहाट करून आपल्या डोक्यावर हिंदी लादायचा हा प्रयत्न आहे; अशी त्यांची भावना झाली. आणि या भावनेमुळे निर्माण झालेल्या त्यांच्या प्रतिक्रियेमुळे दक्षिणी, बंगाली व इतर भाषाभिमानी राज्यांनी हिंदीला विरोध करून तिला राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्याची योजना हाणून पाडली.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

पालकांनी चालवलेला बालकांचा छळवाद (ले. प्रा० मनोहर राईलकर)

१८६८ मध्ये जपाननं विज्ञानात झेप घ्यायचं ठरवलं. एकदा त्यांनी हे ठरवल्यावर त्यांना कुणीच रोखू शकलं नाही. जपाननं आपली मुलं युरोप आणि अमेरिकेत पाठवायला सुरुवात केली. तिथलं शिक्षण संपल्यावर त्यांना त्यांनी परत बोलावलं आणि ‘जे काय शिकला असाल ते सारं सुदैवाने तथाकथित ‘बोजड’ शब्दांचीसुद्धा आपल्यासारखी तिथं कुणी टिंगलटवाळी केली नाही. कुठलेही शब्द तसे मूलत: निर्थकच असतात; वापरण्यानंच त्यांना अर्थ चिकटतो. त्यांच्या सुदैवानं ‘जपानी भाषा विज्ञानासाठी सक्षम नाही,’ असं म्हणणारा कुणी पंडित जपानमध्ये नव्हता. आणि असता, तरी त्यांनी त्याला जुमानलं नसतं, किंवा कदाचित तोच असले उद्गार काढायला धजावला नसावा.

प्रा० राईलकरांचा हा पूर्ण लेख पुढील दुव्यावर उपलब्ध आहे, तो पहा.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , ,

जगाची भाषा (?) आणि आपण (ले० सुधन्वा बेंडाळे)

प्रिय स्वाभिमानी मराठी बांधवांनो,

जगाची भाषा इंग्रजी असल्यामुळे आपण इंग्रजी शिकलो नाही तर जगातच नव्हे तर देशात, राज्यातही आजच्या स्पर्धायुगात मागे पडू अशी आपल्याला भीती असते. पण इंग्रजी खरोखरच संपूर्ण जगाची भाषा आहे का?

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ (संपादक: विलास खोले)

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

संपादक : विलास खोले

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे: २३८, मूल्य: २५० रूपये

केशवराव कोठावळे ( २१ मे १९२३ – ५ मे १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – ‘मराठी बोलू कौतुके…’ (मुंबई मराठी साहित्य संघ)

एका नवीन उत्तम पुस्तकाबद्दल माहिती वाचल्यावर ती आपणा सर्वांपर्यंत पोचवावीशी वाटली म्हणूनच हा प्रपंच.

दैनिक सकाळ, बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ मधील वृत्त:

साहित्य संघाचाही मराठीचा झेंडामराठी बोलू कौतुके…

मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानोबा-तुकोबांची ‘अमृताते पैजा जिंके’ म्हटल्या जाणार्‍या मराठी भाषेचे वैभव सांगणार्‍या एका देखण्या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाली आहे. ‘मराठी बोलू कौतुके…’

या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे (शिवाजी महाराजांच्या पत्रातील मराठी भाषा), डॉ. सदानंद मोरे (तुकारामाचे काव्य आणि मराठी भाषा), डॉ. मो. दि. पराडकर (पंडिती काव्याचे मराठीला योगदान), डॉ. रामचंद्र देखणे (लोककाव्य आणि मराठी भाषा) आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो (मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान) आदी लेखकांनी मराठीविषयीचे चिंतन केले आले आहे.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

’इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाविषयी वाचकांच्या काही उल्लेखनीय प्रतिक्रिया

‘इंग्रजी भाषेचा विजय’ या लेखाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांबद्दल श्री० सलील कुळकर्णी यांनी केलेले विवेचन.

—————-

प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,

सप्रेम नमस्कार.

काही महिन्यांपूर्वी अटल बिहारी वाजपेयींनी लोकसभेत केलेल्या भाषणाबद्दलचा लेख मला पुण्यातील आमचे ज्येष्ठ सुहृद प्रा० राईलकर यांच्याकडून मिळाला. प्रा० राईलकर हे आमच्या दृष्टीने समर्थ रामदासांप्रमाणे ऋषितुल्य गुरू व मार्गदर्शकच आहेत. अशा व्यक्तींच्या संपर्कात राहण्यास मिळते हे माझे मोठेच भाग्य!

वाजपेयींच्या भाषणामध्ये इंग्रजांनी ६०० वर्षांच्या आपल्या भाषाविषयक न्यूनगंडावर व मानसिक दास्यत्वावर निश्चयाने कसा विजय मिळवला याबद्दलचा उल्लेख वाचला व माझे कुतुहल मला स्वस्थ बसू देईना. इंग्रजांची सतराव्या शतकातील मानसिक स्थिती व आपली आजची स्थिती यात मला अनेक बाबतीत विलक्षण साम्य वाटले व ह्याबद्दलची सर्व माहिती जमवून आपल्या मराठी बांधवांसमोर ठेवलीच पाहिजे असे मला प्रकर्षाने वाटू लागले. त्याबद्दलची माहिती महाजाल, वाजपेयींनी संदर्भित केलेले पुस्तक इत्यादी स्रोतांमधून मिळवली व मग प्रस्तुत लेख तयार केला.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , ,

राज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय? (मराठी अभ्यास केंद्राचे निवेदन)

निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हल्लीच पंतप्रधान मनमोहन सिंग व कॉंग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी महाराष्ट्रातील मराठीविषयक आग्रही भूमिकेबद्दल केलेल्या दिशाभूल करणार्‍या विधानांचा प्रतिवाद करण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राने प्रकाशित केलेले निवेदन.

Marathi Abhyas Kendra (12th October 2009)

We refer to the misleading comments of Prime Minister Manmohan Singh and Congress President Sonia Gandhi made during the recent election campaigning in Maharashtra, wherein they emphasised that they treat all the languages in India as equal and having pride for one’s language and considering it above other languages is tantamount to divisive politics. In this context we have a doubt.

Read the rest of this entry »

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

मराठी शाळांची थडगी उभारण्याचं धोरण थांबवा (ले० प्रा० दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र)

भारतातील सर्व भाषाभिमानी राज्यांनी आपापली राज्यभाषा शालेय शिक्षणात (पाचवी ते दहावी) सक्तीची केलेली आहे. तेथील राज्यशासन बहुजनसमाजापर्यंत ज्ञान पोचवण्याच्या दृष्टीने स्थानिक भाषेतील शाळांना व महाविद्यालयांना जास्तीतजास्त मदत करतात. भाषाभिमानाच्या बाबतीत कुठलाही पक्ष मोडता घालू शकत नाही, अगदी कॉंग्रेस पक्ष देखिल. मात्र महाराष्ट्रातील परंपरेनुसार स्वभाषा आणि स्वसंस्कृती याबद्दल पूर्णपणे अनास्था आढळते. आपण परक्यांची खुशामत करण्यातच ’यशवंत’ होण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातच धन्यता मानतो.

प्रा० दीपक पवार, (अध्यक्ष, मराठी अभ्यास केंद्र) यांनी लिहिलेला खालील लेख पहा.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – ’प्रिय जी. ए.’ (ले० सुनीता देशपांडे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

प्रिय जी. ए.

लेखिका: सुनीता देशपांडे

मौज प्रकाशन गृह, पृष्ठे: १८६, मूल्य: २०० रूपये

नाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे

दिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे

अशी मनाची धारणा मधून मधून होते. पण मग वाटतं, हे सर्वस्वी खरं असतं का? तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो? कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का? तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत जाते. असलं जीवन बेचव खरं, पण ही अवस्था फार वेळ टिकत नाही, हेही खरं. आपली इच्छा असो वा नसो, काही तरी असं घडतच असतं की आपल्या कोशातून आपल्याला बाहेर पडण्यावाचून गत्यंयरच नसतं. मग पुन्हा काही काळ का होईना, आपण चारचौघांसारखं होऊन जातो. ही नैसर्गिक गरज आहे. अशा अनेक नैसर्गिक गरजा आपल्याला अगदी लहान करून टाकतात. अहंकार, अस्मिता वगैरे शब्दांचा पार भुसा करून टाकतात. आपणच इतकं लहान आणि इतकं मोठं आणि या दोन टोकांच्या मधलंही, असे सर्व काही असतो. अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा! म्हणजे निश्चित असं आपण काहीच नसतो.  त्या त्या क्षणी ते ते असतो. तेव्हा ही वैफल्याची जाणिव खरी आहे, तितकंच तिच्यावर स्वार होऊन माणसं दौडत फार मोठा पल्ला गाठू शकतात हेही खरं आहे. कारण शेवटी काहीच खरं नाही तसं काही खोटंही नाही हेच खरं आहे.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , ,

संगणित: संगीतातील स्वरांचे गणित (ले० प्रा० मनोहर राईलकर)

संगीताची मुळीच आवड नाही अशी व्यक्ती आज सापडणे कठीण. आपल्यासारख्या सामान्य रसिकांना संगीताची आवड असते आणि त्यातील अनेक गूढ, तांत्रिक नियमांबद्दल कुतूहलही असते. ‘सा’ म्हणजे काय? संवादिनीच्या (बाजाच्या पेटीच्या) कुठल्याही पट्टीला ‘सा’ म्हणता येईल असं म्हणतात, ते कसं? वरचा सा, खालचा ‘सा’ म्हणजे काय? एखादा गायक ‘काळी एक’ या पट्टीमध्ये गातो तर एखादी गायिका ‘काळी तीन’ या पट्टीत गाते; असे कधीकधी ऐकू येते, त्याचा अर्थ काय? पाश्चात्य स्वर व भारतीय स्वर यांमध्ये साम्य व भेद कोणते? असे अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्याला पडत असतात, पण आपल्याला ते समजण्यातले नाही असा विचार करून आपण ते कुतूहल तसंच दडपून टाकतो. पण संगीतशास्त्रातील स्वरांच्या गणिताबद्दलच्या खालील लेखामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०९. इतर संकीर्ण विषय , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – ’तेजशलाका इरेना सेंडलर’ (ले० अभिजीत थिटे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

तेजशलाका इरेना सेंडलर

लेखक: अभिजीत थिटे

अमेय प्रकाशन, पृष्ठे: ११६, मूल्य: १५० रुपये

होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद, हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे “कर्तृत्व” पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून? मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील? ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकी असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो तो हाच असतो. घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणा-यांत काही स्त्रियाही होत्या. लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणा-यातही काही स्त्रिया होत्या. आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडवणारी, मायेची पखरण घालणारी इरेना नावाची एक आईही होती.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , ,

पन्हाळा: एक अनुभव. मराठी माणसाची अधोगती – स्वाभिमान ते निरभिमान

आपले एक पुण्याचे मित्र श्री० सलील कुळकर्णी यांनी सांगितलेला एक भावपूर्ण अनुभव. वाचून पहा आणि आपल्या भावना अवश्य कळवा.

—————————————

प्रिय मराठी बांधवांनो,

सप्रेम नमस्कार.

मी मध्यंतरी काही कामानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो. तिथून एके दिवशी मराठी माणसाच्या पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक अशा पन्हाळगडाला भेट दिली. तिथे आलेला अनुभव मला तुम्हाला सांगावासा वाटतो. महाराष्ट्राचा इतिहास आणि त्याचे वर्तमान यात जमीन-अस्मानाचा फरक झाला आहे, केवळ ऐहिक प्रगतीच्या दृष्टीनेच नव्हे तर अगदी मूलभूत स्वभाव वैशिष्ट्य़ांमध्येसुद्धा. स्वदेश व स्वसंस्कृतीसाठी दिल्लीच्या मोगलाईशी प्राणपणाने लढणारा मराठी माणूस आज दिल्लीश्वरांपुढे गोंडा घोळण्यात धन्यता मानतो. फारशी, अरबी भाषांमधील शब्दांच्या आक्रमणापुढे मराठी भाषा लोप पावण्याची भीती ओळखून मराठीभाषाशुद्धीसाठी मराठीतील (बहुधा देशातील) पहिला राजव्यवहार शब्दकोश बनवून घेणार्‍या पराकोटीची दूरदृष्टी असलेल्या शिवछत्रपतींचे वंशज म्हणवणार्‍या आपणाला आज आपल्या राज्यात आपल्या मायबोलीची व संस्कृतीची पूर्णपणे उपेक्षा करून इंग्रजी आणि हिंदी भाषांची जबरदस्ती करण्याच्या प्रयत्नांबद्दल काहीही खंत न वाटता उलट त्यात प्रतिष्ठा वाटते.

हा टोकाचा परस्परविरोध मला पन्हाळा-भेटीत अधिक प्रकर्षाने जाणवला व त्याबद्दल आपण काहीच करू शकत नाही ही हतबलता लक्षात येताच शरमेने मान खाली झाली.

माझी ही रडकथा तुम्हालाही ऐकवावी व माझ्या दुःखात सहभागी करून घ्यावे या उद्देशाने हे पत्र लिहित आहे. (आनंद एकटाच उपभोगावा आणि दुःखात मात्र वाटेकरी शोधावे असा माणसाचा स्वार्थी स्वभाव असतो, त्यालाही हे धरूनच आहे म्हणा.)

पन्हाळा हे कोल्हापूरपासून केवळ २० कि०मी०वर सह्याद्रीच्या कुशीत वसलेले सुमारे ४००० लोकवस्तीचे एक गाव. क्षेत्रफळ विस्तीर्ण म्हणजे ४०० एकराचे असले तरीही तसे हे खेडेच. जमीन ही काळ्या कातळाची व जांभा दगडाची असल्यामुळे शेती अशी नाहीच. गुरांना चरायलाही फारशी माळराने नाहीत. पाण्यासाठी विहीरी मात्र बर्‍याच आहेत असे म्हणतात. पण एकंदरीत शेती व दूधदुभत्याच्या अभावामुळे येथील स्थानिक जनता उदरनिर्वाहासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मुख्यतः पर्यटनावरच अवलंबून. पण पर्यटन व्यवसायही पूर्णपणे ऋतुकालावर अवलंबून (seasonal) असल्यामुळे एकंदरीत तशी गरीबीच आढळते. शिक्षणाचे प्रमाणही फार नसावे. एकूण लोकसंख्येपैकी बरेच मुसलमान आहेत आणि तेही शिवाजी महाराजांवर प्राणापलिकडे निष्ठा असणारा व त्यांच्यासाठी बलिदान करणारा पन्हाळ्याचाच सिद्दी वाहब (महाराजांचा अंगरक्षक सिद्दी हिलाल याचा मुलगा) याच्या नावाने शपथ घेणारे. सर्वांची मातृभाषा, (पितरभाषासुद्धा) मराठीच.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीतून उपलब्ध

प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,

आजच्या (१५ सप्टेंबर २००९ च्या) म०टा० मध्ये खालील बातमी आली आहे, ती आपल्या माहितीसाठी देत आहे.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०४. बित्तंबातमी , , , , , , , , , , , , , ,

स्थानिक आळशी मराठी माणूस आणि कामसू पाहुणे….

वरील विषयावर आम्हा मराठीप्रेमी मित्रांच्या रिंगणात चर्चा चालली असताना खालील मते मांडली गेली. त्याबद्दल आपल्याला काय वाटते? जरूर लिहा.

श्री० सलील कुळकर्णी म्हणाले:

१. स्थानिक मराठी माणूस परप्रातीयांपेक्षा, विशेषतः भय्या मंडळींपेक्षा आळशी आहे यात शंका नाही. ही गोष्ट समर्थनीय नाही. आज जगात प्रगतीसाठी जिद्द, महत्त्वाकांक्षा, परिस्थितीशी जमवून घेण्याची वृत्ती हे गुण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. पण मराठी आणि परप्रांतीयांशी तुलना करताना फक्त एवढीच गोष्ट लक्षात न घेता या भोवतीची इतर संबंधित वस्तुस्थितीसुद्धा लक्षात घेतली पाहिजे.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०३.१ अस्मिता: भाषिक व सांस्कृतिक , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – ’नीलची शाळा’ (ले० ए० एस० नील)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

नीलची शाळा

लेखक: ए० एस० नील

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७८, मूल्य : २०० रूपये

एक स्वतंत्र व्यक्ती, शिवाय सामाजिक भान असणारा समाजघटक, असं मूल शिक्षणामुळे तयार व्हायला हवं. स्वयंशासन हे नि:संशयपणे घडवून आणतं. ‘आज्ञाधारकता’ हा सदगुण समजला जाऊन सर्वसाधारण शाळेत तो मनावर इतका बिंबवला जातो, की नंतरच्या आयुष्यात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसांकडे कशाला तरी आव्हान देण्याइतकी धमक शिल्लक राहाते. शिक्षकासाठीचं प्रशिक्षण घेत असता हजारो विद्यार्थी – विद्यार्थिनी आपल्या शिक्षकी भविष्याकडे अत्यंत उत्साहानं डोळे लावून बसलेले असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर वर्षभरात शिक्षकी पेशात आपल्या खोलीत बसून ते विचार करतात तो ‘शिक्षण म्हणजे विषय आणि शिस्त’ असा. याला आव्हान देण्याची हिंमत नसते, कारण नोकरी गमावण्याची भीती. काही शिक्षक मनातल्या मनात त्याविरूध्द आवाज उठवतात. आयुष्याची घट्ट झालेली मूस मोडून काढणं फार कठीण. अशीच आणखी एक पिढी मोठी होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधनं, नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादत जाते. तेच ते जुनं दुष्टचक्र. या गोष्टी ज्यांच्यावर बिंबवल्या जातात ती सर्वसामान्य माणसं, यातल्या वाईट गोष्टी नुसत्या स्वीकारून थांबत नाहीत तर त्या गृहितच धरतात, हे आणखी दुर्दैव.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये

पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं:

मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.

तुमचं कविता लेखन काय म्हणतय?

उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – ‘व्हाय नॉट आय?’ (ले० वृंदा भार्गवे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

व्हाय नॉट आय?

लेखिका: वृंदा भार्गवे

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये

सायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.

जखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, “डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. “

मी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , , ,

पुस्तक ओळख – स्वरार्थमणी : रागरससिद्धांत (ले० गानसरस्वती किशोरी आमोणकर)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत

लेखिका: गानसरस्वती किशोरी आमोणकर

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये

वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते. ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता – म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.

पुढे सविस्तर वाचा…

Filed under: ०६.१ समीक्षा-रसग्रहण-परीक्षणे , , , , , , , , , , , , , , , , , ,

मुलांसाठी दुवे: चित्रकथा, मराठी बालगीते, ई-पुस्तके, वैज्ञानिक खेळणी…

मुलांसाठी दुवे: चित्रकथा, मराठी बालगीते, अभ्यास, ई-पुस्तके, खेळणी बनविणे इत्यादी.:

अधिक माहितीसाठी पुढे वाचा…

Filed under: १०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे , , , , , , , , , , , ,

दुवे: मराठी मनोरंजन, चित्रपट, नाटके, भाषणे, व्हिडियो…

मराठी मनोरंजन, चित्रपट, नाटके, भाषणे, व्हिडियो इत्यादींसाठी दुवे:

अधिक माहितीसाठी पुढे वाचा…

Filed under: १०. आपुलकीचे दुवे: काही महत्वाच्या संस्थळांचे व अनुदिनींचे दुवे , , , , , , , , , , , , , , ,

अनुदिनी उघडण्याआधी हे वाचा

हल्लीच प्रकाशित केलेले लेख:

पूर्वी प्रकाशित झालेले लेख (Archives)

प्रशासकीय (नियमितपणे लेखाची प्रत मिळण्यासाठी RSS Feed वापरा):