भाषा आणि संस्कृतीच्या संबंधाबाबत लोकमान्य म्हणतात, “मराठीच कशाला, कोणत्याही भाषेचं असंच आहे. तिच्या विकासाला हातभार लावते ती संस्कृती. त्या संस्कृतीचा जवळून परिचय व्हायला हवा. नाही तर ती भाषा अवगत झाली असं म्हणता येणार नाही.”
कॅटेगरी: ०७. गाल्यातल्या गालात, की खोखो हसायचं, तुम्हीच ठरवा…
शासकीय पाठ्यपुस्तक आणि मी (ले० सुभाष भेंडे)
‘गड्या आपुला गाव बरा‘ हे माझ्या अमेरिका भेटीवर आधारलेलं प्रवासवर्णन. अमेरिकेत आज सुबत्ता आहे, सुखाची रेलचेल आहे. परंतु काही बाबतीत त्या देशात अध:पतन कसं चालू आहे याविषयी सारांशरूपानं लिहिलं होतं. त्याचा समावेश बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी झाला…
काळ्यांची पांढर्यांवर मात (लोकमान्यांचा किस्सा)
एके दिवशी मी टिळकांकडे बसलो असता ‘केसरी’त प्रसिद्ध करण्याकरिता बुद्धिबळांचा एक डाव त्यांचेकडे आला. तो त्यांनी भूमितीच्या प्रश्नाप्रमाणे कागदावर पाहूनच तोंडाने सोडविला.
पु० ल० देशपांडेंचे किस्से
आपले एक मुंबईचे मित्र वैद्य शैलेश नाडकर्णी (एम०डी०, आयुर्वेद) ह्यांनी आपल्या बटव्यातून काढून कडू वटीच्या ऐवजी आंबटगोड जिरागोळ्यांसारख्या काही गोळ्या पाठवल्या आहेत. माननीय वैद्यराज म्हणतात, “या गोळ्या मानसिक ताण, दैनंदिन काळज्या यांवर अत्यंत गुणकारी असून रुग्णाच्या चिंतेचा नाश होऊन तो आनंदाने पुलकित होतो. या गोळ्या आपण दिवसातून कितीही वेळा घेऊ शकतो. यांच्या ’वयस्थापक’ आणि ’जरानाशक’ गुणांमुळे यांच्या नियमित सेवनाने माणसाला दीर्घायुष्य आणि चिरयौवनाचा लाभ होतो.
अर्थात या गोळ्यांचे मूळ कर्ते चरकादि आयुर्वेदाचार्य नसून आपल्या सर्वांचे आवडते विनोदाचार्य पु० ल० देशपांडे आहेत.
पहा तर मग या गोळ्या चाखून.
आचार्य अत्र्यांचे किस्से
हजरजबाबीपणा, चातुर्य, विनोद, अशा गुणांच्या बाबतीत जुन्या काळातील उत्तरेतील बिरबल, दक्षिणेकडचा तेनालीराम व खुद्द महाराष्ट्रातील नाना फडणवीस यांसारख्या व्यक्ती त्यांच्या संबंधित गुणांचे प्रतिनिधी मानल्या जाऊ लागल्या. त्यांच्या चातुर्याविषयी आणि हजरजबाबीपणाविषयी अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. कालपरत्वे त्यांना चातुर्य आणि हजरजबाबीपणाचे मूर्तिमंत अवतारच मानले जाऊ लागले. अर्थात त्यांच्या संबंधित कथांपैकी सत्यकथा किती आणि दंतकथा किती हे ठरवणे पौराणिक कथांप्रमाणेच कठीण. पण तसा शहानिशा करायची गरज तरी काय म्हणा! आपण त्यातून मिळणारा आनंद लुटायचा. अलिकडील काळात आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे या व्यक्तींनासुद्धा तशाच प्रकारे हजरजबाबीपणा आणि शब्दकोट्यांचे अर्क मानले जाऊ लागले आणि मग त्यांच्या अनेक कथांच्या बरोबर आणखी काही कथांची भर घालून काही हौशी (पण दुर्दैवाने समाजमान्यता न लाभलेल्या) लेखकांनी त्यांच्या नावाखाली आपला माल खपवून हौस भागवून घेतली असावी. पण तरीही त्यामुळे आपल्या आनंदात काहीच कमतरता येत नाही. ज्या दंतकथा लोकमान्य होतात त्या खर्यांच्या बरोबरीने चिकटून राहतात व असे दंतवाङ्मयही वाढत जाते. (आचार्य अत्रे आणि पुल यांच्या निधनानंतरही त्यांच्या वाक्चातुर्याच्या किश्शांमध्ये भरच पडत गेली असावी अशी माझी ठाम समजूत आहे. असो.
आपला एक मित्र, रवि पाटणकर (मु० मालाड, मुंबई) याने अत्र्यांचे असेच काही किस्से पाठवले आहेत. हा आपला मालाडचा म्हा…, चुकलो, चिरतरूण मित्र, शेकोटीला गप्पा मारायला बसला की असे निरनिराळ्या प्रसिद्ध व्यक्तींचे बरेच किस्से सांगतो. आपण नुसतं आपलं गदगदणारं पोट धरून हसायचं. हसण्याने आयुष्य वाढतं असं म्हणतात. तर पहा ही पाटणकर काढ्याची मात्रा किती लागू पडते ती.