जुने उत्तमोत्तम साहित्य पुनःप्रसिद्ध करणारे ‘ऐसी अक्षरे’ हे द्वैमासिक

प्रिय मराठीसाहित्यप्रेमी मित्रहो,

सप्रेम नमस्कार.

‘बेलवलकर हाऊसिंग’ ह्या मराठी बांधकाम-व्यावसायिक गटातर्फे  ‘ऐसी अक्षरे’ हे द्वैमासिक प्रसिद्ध केले जाते. त्यात दर दोन महिन्यांनी बेलवलकरांद्वारे नावाजलेल्या मराठी साहित्यिकांचे उत्तमोत्तम साहित्य पुनःप्रकाशित केले जाते. आपले वाचायचे राहून गेलेले असे विविध ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मराठी साहित्यिकांचे लेख, कथा, कविता इत्यादी आपल्याला सहजपणे ऐसी अक्षरेमध्ये वाचायला मिळतात. मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यसागरात बुडी मारून त्यातील निवडक रत्ने दर दोन महिन्यांनी ‘ऐसी अक्षरे’च्या ताटात वाढून मराठी रसिकांसमोर सादर केली जातात. बेलवलकरांनी मराठीसाहित्यप्रेमी जनांस उपलब्ध करून दिलेल्या ह्या सुविधेचा आपण सर्वांनी अवश्य फायदा घ्यावा.

Read More »

’मनातल्या मनात मी’ (कवि सुरेश भट)

सुरेश भटांची एक अत्युत्कृष्ट कविता. नुकतीच श्रीनिवास नार्वेकर या आपल्या रसिक मित्राने पाठवली. वाचली होती. पण पुनःपुन्हा वाचूनही अशा कवितांचा कंटाळा तर येत नाहीच; उलट त्यांच्यामुळे आता मनाच्या कोपर्‍यात वळचणीला पडलेल्या जुन्या सुखद आठवणींच्या वरची धूळ झटकली जाऊन त्या आठवणींच्या उबेने मन काही क्षणापुरते का होईना पण पुन्हा टवटवीत होते व आयुष्याचे काही क्षण अत्यंत स्वर्गीय आनंदात जातात.

असा आनंद वाटत फिरणार्‍या मित्राचे आभार कसे मानायचे?

कविता खालील दुव्यावर वाचा. भविष्यकाळातही जेव्हा मनाचा तो नाजुक कोपरा उघडून पहावासा वाटेल तेव्हा पुन्हा वाचा. त्यामुळे जाग्या होणार्‍या आठवणींमुळे स्वतःचे सांत्वन करता येईल की – “देवाने आपल्यावर केवळ अन्यायच नाही केला.”

अमृतमंथन_मनातल्या मनात मी_कवि सुरेश भट

.

आपल्या प्रतिक्रिया, भावना, रसग्रहणे, निरूपणे, अभिप्राय, लेखाखालील रकान्यात अवश्य लिहा. सर्वच रसिकमित्रांबरोबर तो आनंद वाटून घेऊ.

– अमृतयात्री गट

.

च्यायला, आपल्या भाषेत असं ठेवलंय तरी काय? (ले० अतुल तुळशीबागवाले)

भारतीय संस्कृतीचे मूळ हे अशा काही मोजक्या तत्त्वांत आहे असे मी समजतो, व त्यावरून आपली नैसर्गिक जीवनशैली ओघाने येतेच. इतका सहजपणा आणि विवेक मी अन्य कुठेही बघितला नाहिये. पण निसर्गाबरोबर एवढ्या समरसतेने राहूनही १५०० वर्षांपूर्वीचा आर्यभटाचे गणित आता आधुनिक समजल्या जाणार्‍या गणिताच्या तोडीचं निघालं, आणि कणादांनी २००० वर्षांपूर्वी अणूंची कल्पना मांडली. आयुर्वेद, हठयोग व अन्य स्वास्थ्यविषयक शास्त्रांचा प्रभावीपणा तर आपल्या सर्वांना माहितच आहे.

Read More »

’अखेर कमाई’ (कवी कुसुमाग्रज)

मनाला उबग आणणार्‍या महाराष्ट्रातील जातीय राजकारणावर कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी आपल्या ’अखेर कमाई’ या कवितेत अत्यंत मार्मिक भाष्य केले आहे.

Read More »

अबू आझमीने उस्ताद अब्दुल करीम खानसाहेबांचा कित्ता गिरवावा (ले० जावेद नकवी, इंग्रजी दै० डॉन, पाकिस्तान, दि० १९ नोव्हें० २००९)

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील प्रसिद्ध किराणा घराण्याचे संवर्धक-प्रवर्तक उस्ताद अब्दुल करीम खान साहेब यांच्या महाराष्ट्र व मराठी संस्कृतीला दिलेल्या योगदानाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याचा सल्ला अबू आझमीला देण्यासाठी श्री० जावेद नकवी ह्या पाकिस्तानातील डॉन या अग्रगण्य दैनिकाचे प्रसिद्ध पत्रकार आणि स्तंभलेखक ह्यांनी लिहिलेला हा इंग्रजी लेख.

जरी श्री० नकवी यांची काही राजकीय मते आपल्याला कदाचित पटणार नाहीत; पण तरीही त्यांचा भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचा अभ्यास, तसेच मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संपन्नता आणि प्रगल्भतेबद्दलची जाण आणि आदरभावना ह्या गोष्टी आश्चर्यचकित करतात आणि अटकेपार झेंडे रोवलेल्या मराठ्यांच्या कीर्तीचे पडघम अजुनही दूरपर्यंत वाजताहेत हे समजल्यावर छाती अभिमानाने फुलून येते.

Read More »

मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन ! (वृत्त: प्रेषक सुशांत देवळेकर)

मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !

संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत सादर करीत आहोत.

Read More »

पुस्तक ओळख – केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ (संपादक: विलास खोले)

केशवराव कोठावळे पारितोषिक ग्रंथ

संपादक : विलास खोले

मॅजेस्टिक प्रकाशन, पृष्ठे: २३८, मूल्य: २५० रूपये

केशवराव कोठावळे ( २१ मे १९२३ – ५ मे १९८३) व त्यांचे मॅजेस्टिक प्रकाशन ही मराठी प्रकाशनव्यवसायावरील अमिट मुद्रा आहे. स्वत:च्या कल्पकतेने, संयोजनकौशल्याने व एकहाती नियंत्रणपद्धतीने केशवरावांनी ती उमटवली आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे वाडमयीन क्षेत्रातील कार्य सगळ्यांना सुपरिचित आहे. मॅट्रिक होण्यापूर्वीच शाळा सोडलेल्या केशवरावांनी फूटपाथवरच्या पुस्तकविक्रीपासून आपला व्यवसाय सुरू केला, हे सर्वांना ठाऊक आहे. सिनेमाची तिकिटे विकण्यासारखे फुटकळ प्रकार करूनही त्यांनी काही दिवस अल्प प्रमाणात अर्थार्जन केले. काही काळ रोज झोपण्यासाठी मौज प्रेसच्या जागेचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. परंतु यातून बाहेर पडायचेच असे निश्चयपूर्वक ठरवून त्यानुसार एकेक पाऊल पुढे टाकीत केशवरावांनी स्वत:ची बादशाही मिळकत उभी केली. औदुंबराच्या झाडाखालच्या मॅजेस्टिक सिनेमाजवळच्या लहानशा दुकानापासून गिरगावातील प्रसाद चेंबर्समधल्या अद्ययावत कार्यालयापर्यंत आणि पुण्यातल्या तीनमजली भव्य इमारतीपर्यंत आपल्या प्रकाशनव्यवसायाचा विस्तार घडवून आणला. दारिद्र्याचे चटके आणि समृद्धीचे वैभव दोन्ही अनुभवले. त्यांचे बहुतेक निर्णय अचूक ठरले आणि दैवयोगाच्या भरवशावर व ग्राहकांविषयीच्या अंदाजावर प्रकाशन व्यवसायात त्यांनी मोठी मजल मारली.

Read More »

पुस्तक ओळख – ‘मराठी बोलू कौतुके…’ (मुंबई मराठी साहित्य संघ)

एका नवीन उत्तम पुस्तकाबद्दल माहिती वाचल्यावर ती आपणा सर्वांपर्यंत पोचवावीशी वाटली म्हणूनच हा प्रपंच.

दैनिक सकाळ, बुधवार, २१ ऑक्टोबर २००९ मधील वृत्त:

साहित्य संघाचाही मराठीचा झेंडामराठी बोलू कौतुके…

मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानोबा-तुकोबांची ‘अमृताते पैजा जिंके’ म्हटल्या जाणार्‍या मराठी भाषेचे वैभव सांगणार्‍या एका देखण्या ग्रंथाची निर्मिती पूर्ण झाली आहे. ‘मराठी बोलू कौतुके…’

या ग्रंथात बाबासाहेब पुरंदरे (शिवाजी महाराजांच्या पत्रातील मराठी भाषा), डॉ. सदानंद मोरे (तुकारामाचे काव्य आणि मराठी भाषा), डॉ. मो. दि. पराडकर (पंडिती काव्याचे मराठीला योगदान), डॉ. रामचंद्र देखणे (लोककाव्य आणि मराठी भाषा) आणि डॉ. सिसिलिया कार्व्हालो (मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान) आदी लेखकांनी मराठीविषयीचे चिंतन केले आले आहे.

Read More »

पुस्तक ओळख – ’प्रिय जी. ए.’ (ले० सुनीता देशपांडे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

प्रिय जी. ए.

लेखिका: सुनीता देशपांडे

मौज प्रकाशन गृह, पृष्ठे: १८६, मूल्य: २०० रूपये

नाहीच कुणी अपुले रे, प्राणावर नभ धरणारे

दिक्काल धुक्यांच्या वेळी ह्र्दयाला स्पंदवणारे

अशी मनाची धारणा मधून मधून होते. पण मग वाटतं, हे सर्वस्वी खरं असतं का? तसे आपण तरी कुठे कुणाचे असतो? कधी कधी मनानं असलो तरी प्रत्यक्षात ते शक्य असतं का? तेव्हा आपल्याच मर्यादा लक्षात आल्या की आपल्या अपेक्षांनादेखील आपोआपच मर्यादा पडतात आणि मग निराशेची तीव्रताही ओसरत जाते. असलं जीवन बेचव खरं, पण ही अवस्था फार वेळ टिकत नाही, हेही खरं. आपली इच्छा असो वा नसो, काही तरी असं घडतच असतं की आपल्या कोशातून आपल्याला बाहेर पडण्यावाचून गत्यंयरच नसतं. मग पुन्हा काही काळ का होईना, आपण चारचौघांसारखं होऊन जातो. ही नैसर्गिक गरज आहे. अशा अनेक नैसर्गिक गरजा आपल्याला अगदी लहान करून टाकतात. अहंकार, अस्मिता वगैरे शब्दांचा पार भुसा करून टाकतात. आपणच इतकं लहान आणि इतकं मोठं आणि या दोन टोकांच्या मधलंही, असे सर्व काही असतो. अणुरेणुया थोकडा, तुका आकाशाएवढा! म्हणजे निश्चित असं आपण काहीच नसतो.  त्या त्या क्षणी ते ते असतो. तेव्हा ही वैफल्याची जाणिव खरी आहे, तितकंच तिच्यावर स्वार होऊन माणसं दौडत फार मोठा पल्ला गाठू शकतात हेही खरं आहे. कारण शेवटी काहीच खरं नाही तसं काही खोटंही नाही हेच खरं आहे.

………………………………………………………………………….

प्रिय रसिकांनो,

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. आपल्यालाही हे विचारधन पाठवायला सुरुवात केली आहे.

मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत,

शुभदा रानडे-पटवर्धन

shubhadey@gmail.com

ranshubha@gamil.com

पुस्तक ओळख – ’तेजशलाका इरेना सेंडलर’ (ले० अभिजीत थिटे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

तेजशलाका इरेना सेंडलर

लेखक: अभिजीत थिटे

अमेय प्रकाशन, पृष्ठे: ११६, मूल्य: १५० रुपये

होलोकास्ट, अर्थात ज्यूंचा वंशविच्छेद, हा मानवी जीवनातला अत्यंत कलंकित भाग आहे. त्या वेळची क्रूरता केवळ अतर्क्य. कोण एक हिटलर नावाचा माणूस उठतो. सबंध राष्ट्राला एका वंशाविषयी चिथावतो. देश शुद्ध करण्याचं विचित्र स्वप्न पाहतो. ते देशाच्या गळी उतरवतो आणि चार वर्षांच्या अवधीत साठ लाख लोकांचा मृत्यू घडवून आणतो. हा कलंक नाही तर काय आहे? हिंस्त्र म्हणून प्रसिद्ध असणारे वाघ-सिंहासारखे प्राणी भूक नसेल तर उगाचच शिकार करत नाहीत. माणसाचं हे “कर्तृत्व” पाहिलं की तेही शरमेनं माना खाली घालतील. महायुद्ध संपून सत्तर वर्ष होत आली तरी या जखमा भरत नाहीत. भरणं शक्यही नाही. आपल्या देशाच्या फाळणीच्या जखमा भरल्यात अजून? मग अत्यंत क्रूरतेनं झालेल्या वंशविच्छेदाच्या जखमा कशा बुजतील? ज्यूंची आजची पिढीही या जखमा बाळगते आहे. अशा वेळी इरेनासारख्या व्यक्ती दिलासा देतात. माणूस नावाच्या प्राण्यात माणुसकी असते, हे त्या दाखवून देतात. आपण आशेचा किरण म्हणतो तो हाच असतो. घेटोतल्या लहान मुलांना मृत्यूच्या खाईत ढकलणा-यांत काही स्त्रियाही होत्या. लहान मुलांना फसवून वेगवेगळ्या प्रयोगांसाठी फूस लावून पळवून नेणा-यातही काही स्त्रिया होत्या. आणि त्याच वेळी त्यांना पदराखाली दडवणारी, मायेची पखरण घालणारी इरेना नावाची एक आईही होती.

Read More »

पुस्तक ओळख – ’नीलची शाळा’ (ले० ए० एस० नील)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

नीलची शाळा

लेखक: ए० एस० नील

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : २७८, मूल्य : २०० रूपये

एक स्वतंत्र व्यक्ती, शिवाय सामाजिक भान असणारा समाजघटक, असं मूल शिक्षणामुळे तयार व्हायला हवं. स्वयंशासन हे नि:संशयपणे घडवून आणतं. ‘आज्ञाधारकता’ हा सदगुण समजला जाऊन सर्वसाधारण शाळेत तो मनावर इतका बिंबवला जातो, की नंतरच्या आयुष्यात जेमतेम हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या माणसांकडे कशाला तरी आव्हान देण्याइतकी धमक शिल्लक राहाते. शिक्षकासाठीचं प्रशिक्षण घेत असता हजारो विद्यार्थी – विद्यार्थिनी आपल्या शिक्षकी भविष्याकडे अत्यंत उत्साहानं डोळे लावून बसलेले असतात. मात्र शिक्षण संपल्यानंतर वर्षभरात शिक्षकी पेशात आपल्या खोलीत बसून ते विचार करतात तो ‘शिक्षण म्हणजे विषय आणि शिस्त’ असा. याला आव्हान देण्याची हिंमत नसते, कारण नोकरी गमावण्याची भीती. काही शिक्षक मनातल्या मनात त्याविरूध्द आवाज उठवतात. आयुष्याची घट्ट झालेली मूस मोडून काढणं फार कठीण. अशीच आणखी एक पिढी मोठी होते आणि ती नव्या पिढीवर तीच ती जुनी बंधनं, नीतिनियम आणि शैक्षणिक वेडेपणा लादत जाते. तेच ते जुनं दुष्टचक्र. या गोष्टी ज्यांच्यावर बिंबवल्या जातात ती सर्वसामान्य माणसं, यातल्या वाईट गोष्टी नुसत्या स्वीकारून थांबत नाहीत तर त्या गृहितच धरतात, हे आणखी दुर्दैव.

Read More »

पुस्तक ओळख – ‘सर्वोत्तम रवींद्र पिंगे’

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

सर्वोत्तम रवींद्र पिंगे

राजहंस प्रकाशन, पृष्ठे: ३०४, मूल्य: २०० रूपये

पोएट बोरकरांच्या अंगणातलं चांदणं:

मानापमान हा माझा विषयच नाही. संमेलनाध्यक्ष झाल्यामुळं मी अधिक मोठा झालो नसतो आणि न झाल्यामुळं लहानही झालेलो नाही. माझी कविता माझ्याबरोबर आहे आणि तेवढं पुण्य मला बस आहे. मला रसिकांचा कौल हवा होता आणि मला वाटतं तो यावच्चंद्रदिवाकरौ माझ्याच बाजूनं राहील.

तुमचं कविता लेखन काय म्हणतय?

उत्तम चाललय. एक लक्षात ठेवा, मी ईश्वराचा लाडका मुलगा आहे. आय अँम ए मॅन ऑफ डेस्टिनी!

Read More »

पुस्तक ओळख – ‘व्हाय नॉट आय?’ (ले० वृंदा भार्गवे)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

.

व्हाय नॉट आय?

लेखिका: वृंदा भार्गवे

अमेय प्रकाशन, पृष्ठे : २५२, मूल्य : २५० रुपये

सायनला जाताना देवूच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून स्टरलाईज्ड गॉज डोळ्यांवर ठेवायचे. त्यावर काळा गॉगल घालायचे. कधी कडेवर घेऊन बसमध्ये, तिथून स्टेशन. मग परत ट्रेन. सायनला उतरून हॉस्पिटलपर्यंत चालणे, आता तिनेही निमूट सा-याची सवय करून घेतली होती.

जखमा ब-या झाल्या आणि तिच्या डोळ्यात एक पडदाही निर्माण झाला. त्या दिवशी सायनला डॉक्टर माधवानींनी तिचे डोळे तपासायला सुरुवात केली आणि देवूने सांगितले, “डॉक्टर, मला काहीच दिसत नाही. खूप सारा अंधार आहे. ”

मी वेड्यासारखी पाहातच राहिले. डॉक्टरांनाही भीती होतीच. एक विलक्षण कातर क्षण होता तो.

Read More »

पुस्तक ओळख – स्वरार्थमणी : रागरससिद्धांत (ले० गानसरस्वती किशोरी आमोणकर)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

स्वरार्थमणी : रागरससिद्धांत

लेखिका: गानसरस्वती किशोरी आमोणकर

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १५८, मूल्य : ४०० रुपये

वाणीच्या वा वाद्याच्या माध्यमातून जे स्वरमय साकार होते, व्यक्त होते, ते सारे संगीत या शब्दाने ओळखले जाते. ज्याला आपण संगीत म्हणतो, ती खरे म्हणजे स्वरभाषा आहे. मानवी भावसृष्टीचे म्हणजेच मनोवस्थांचे साक्षात तसेच रमणीय दर्शन घडवणारे सौंदर्यप्रधान गायनवादन हेच रागसंकल्पनेचं अधिष्ठान आहे. स्वरमाध्यमातून व्यक्त होणारी श्रवणप्रधानता आणि तर्कनिष्ठता – म्हणजे विवक्षित रागात ठराविकच स्वर येतात, त्या रागाचा विशिष्ट असा एक मुख्य वादी स्वर असतो इत्यादी विधाने- यांना महत्व असते; ते त्या रागाच्या मूळ स्वरूपाचे तत्व, भाव, आणि शास्त्र जाणून घेण्यासाठी किंवा रागभावाच्या वातावरणाची साधारण कल्पना येण्यासाठी. स्वरभाषा हे जसे शास्त्र आहे, तसेच ते भाव प्रकट करणारे नाट्यही आहे आणि काव्यही आहे. राग म्हणजे तालबद्ध, शब्दबद्ध आणि स्वरबद्ध असलेली बंदीश नव्हे. रागविस्तार किंवा रागदर्शन हे वाद्यावर वाजवल्या जाणा-या कोणत्याही तालाच्या आधाराने मांडलेले स्वरप्रकटीकरण किंवा शब्दबद्ध वा नोटेशनबद्ध केलेले संगीतही नव्हे. मग राग म्हणजे नेमके काय, याचा विचार होणे आवश्यक आहे.

Read More »

पुस्तक ओळख – ’व्हाया…वस्त्रहरण’ (अक्षरवाटा – सौ० शुभदा रानडे-पटवर्धन)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………

व्हायावस्त्रहरण

डिंपल प्रकाशन, पृष्ठे : २५६, मूल्य : २५० रुपये

पूर्वी कोकणात बोटीने प्रवास करताना आम्ही नाळीवर बसून प्रवास करीत असू. योगायोग असा की विमानातसुद्धा आम्हाला नाळीवरील (विमानाच्या शेपटीकडील) जागा मिळाली होती. पहाटेचे दोन वाजले होते. सर्वांनीच कसेबसे दोन घास खाऊन रात्री नऊ वाजता घर सोडलं होतं. त्यामुळे सर्वांच्याच पोटात कावळे ओरडत होते. आमचं विमान अध्ये मध्ये कुठेही न थांबता थेट लंडनच्या हिथ्रो विमानतळावर उतरणार होतं. “विमान कुठेही थांबणार नाही” म्हटल्यानंतर आम्हा कोकण प्रांतियांमध्ये चुळबुळ सुरु झाली. कारण आम्हा कोकणवासीयांना धुळीनं माखलेल्या, कुबट वासाच्या, लाल डब्याच्या एसटीतून खाचखळग्यातून धडपडत प्रवास करण्याची सवय. शिवाय तासागणिक “येथे एसटी फक्त पाच मिनिटे थांबेल” असा कंडक्टरचा पत्रा कापल्यासारखा आवाज कानावर पडल्याशिवाय प्रवासही सुखकर होत नसे. पण विमानात खाण्यापिण्याची सर्व सोय आहे, हे कळल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. तरीही “रेड वाईन अजून कशी येना नाय?” अशी काही जणांची चुळबुळ चालू होती.

Read More »

पुस्तक ओळख – ’जीएंची कथा: परिसरयात्रा’ (अक्षरवाटा – सौ० शुभदा रानडे-पटवर्धन)

मी ‘अक्षरवाटा’ मधून वेगवेगळ्या पुस्तकांमधील एक चांगला आणि मला आवडलेला विचार पाठवते. मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन या दृष्टिकोनातून राबवला जाणारा हा उपक्रम आपल्यालाही आवडेल ही अपेक्षा.

सौ० शुभदा रानडे-पटवर्धन

………


जीएंची कथा : परिसरयात्रा

अ. रा. यार्दी / वि.गो. वडेर

राजहंस प्रकाशन, पृष्ठे : १८४, मूल्य : ४०० रुपये

मानवी जीवनात दडलेले द्वंद्व हा जीएंच्या चिंतनाचा मुख्य गाभा असावा. माणूस जगताना प्रत्येक क्षणी बुरखा पांघरून जगत असतो. त्याला जसे जगावेसे वाटते, तसे जगता येत नाही, कारण समाजाचे बुभुक्षित डोळे त्याच्यावर श्वापदांसारखे टपून बसलेले असतात. जीवनातले द्वंद्व हे एकाच वेळी कोवळीक आणि क्रौर्य, काठिण्य आणि पाशवी वृत्ती अशा प्रकारच्या जीवनदर्शनाने समोर उभे राहते. मानवाच्या मनाशी – त्याच्या तळाशी – दडून राहिलेल्या आदिम प्रवृत्ती कोणत्या क्षणी कशा रीतीने प्रकट होतात, आणि सुखी जीवनाला चूड लावतात हे सांगता येत नाही. नेमका हाच तिढा सोडविण्याचा प्रयत्न जीएंनी आपल्या आयुष्यभरच्या कथालेखनातून केला आहे.

Read More »