महिना: एफ वाय
एसटी’ची ई-तिकिटे मराठीतूनच (मराठी जनतेच्या भावना महामंडळापर्यंत पोचल्या?)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन (मरामापम) महामंडळाची तिकिटे मराठीतच असली पाहिजेत व मराठीशिवाय इतर कुठल्याही भाषेत ती छापली जाऊ नयेत अशी राज्यातील मराठीप्रेमींची इच्छा महामंडळापर्यंत पोचलेली दिसते आहे व त्यानुसार जनतेच्या भावनांचा आदर करून राज्य परिवहनाची तिकिटे मराठीतच देण्याचा निर्णय घेतला जाईल अशी आशादायी चिन्हे दिसत आहेत. हा स्वाभिमानी मराठी जनतेचा विजयच मानला पाहिजे. अमृतमंथन परिवाराचेही अभिनंदन !!
हिंदीवाल्यांचे उघडे पडलेले दबावतंत्र (ले० वि० भि० कोलते)
“…… हा युक्तिवाद म्हणजे हिंदी भाषिक गटाच्या बहुमताच्या जोरावर इतर सर्व भाषिकांवर हिंदी सक्तीने लादण्याचा प्रयत्न आहे, याचीही स्पष्ट कल्पना इतर भाषिकांना आली. त्यामुळे झाले काय की, एरवी हिंदीच्या बाजूने असणारे अन्यभाषिक सभासदही विरोधी पक्षाला जाऊन मिळाले. या व अशा भूमिकेमुळेच हिंदीला राष्ट्रभाषेचे स्थान गमवावे लागले आणि केवळ official language – कामकाजाची भाषा या बिरुदावर समाधान मानावे लागले.”
Bhagavatamela: A forgotten Marathi Musical Play Tradition from Thanjavur (The Hindu)
Bhagavata-Mela, a 500 years old art form from Thanjavur with Marathi libretto (words of the musical play) sung to Carnatic music, is perhaps the southern cultural offshoot of the Marathi Sangeet Natak (musical play) traditions.
विचारमंथन – लागणे या शब्दाचे किती अर्थ लागतात?
प्रत्येक भाषेत असे अनेक शब्द असतात की ज्यांचे संदर्भाप्रमाणे वेगवेगळे अर्थ होतात. भाषेवर प्रभुत्व असणारे कवी ह्या अलंकाराचा उत्तम उपयोग करून घेतात. काव्यातील किंवा आलंकारिक भाषेतील या प्रकाराला श्लेष असे म्हणतात. संस्कृत भाषेतील काव्यांत तर अशा उदाहरणांची रेलचेल आहे. मराठीमधील बहुतेक लोकप्रिय विनोदी लेखक, चिं० वि० जोशी, आचार्य अत्रे, पु० ल० देशपांडे इत्यादींनीही मुख्यतः शाब्दिक कोटींवर म्हणजे श्लेषावरच भर दिलेला दिसतो.
एस०टी० महामंडळाची तिकिटे इंग्रजीतच? (वाचकमित्रांच्या सूचना)
महाराष्ट्रातच स्वभाषेबद्दल विशेष अनास्था दिसून येते. येते. राज्यात गावोगावी, खेड्यापाड्यात जाणार्या परिवहन महामंडळाच्या तिकिटांवर मराठीमध्ये तपशील का नाही? कर्नाटक एस०टी०ची तिकिटे जर कन्नड व इंग्रजी भाषेत आहेत तर महाराष्ट्रात ती फक्त इंग्रजीतच का? इंग्रजी ही महाराष्ट्राची राज्यभाषा केव्हापासून झाली?