आस्तिक आणि नास्तिक मंडळींमध्ये वादविवाद, झगडे होत असतातच. आस्तिक नास्तिकांना अश्रद्ध, असंस्कृत, पापी, भ्रष्ट इत्यादी विशेषणे लावतात तर नास्तिक आस्तिकांना अंधश्रद्ध, अडाणी, मूर्ख, अकलेचे कांदे, विश्वविघातक, बुद्धिशत्रू इत्यादी विशेषणांनी संबोधतात. Read More »
Category: ०९. इतर संकीर्ण विषय
मराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर
मराठीमधील पहिला ज्ञानकोश (विश्वकोश) डॉ० श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुमारे ८५ वर्षांपूर्वी जिद्दीने १२-१३ वर्षे झटून एकहाती तयार केला. त्यातील माहिती आजही अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशीच आहे. मराठीमध्ये जागतिक दर्जाचा ज्ञानकोश आणण्यासाठी आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींची पर्वा न करता ह्या उपक्रमासाठी आपले सर्वस्व पणाला लावून शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या सार्वजनिक ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. अशा अलौकिक पुरुषाचे मराठी माणसावर मोठे ऋण आहेत. मराठी माणसाला त्यांचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा ठरेल. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (http://ketkardnyankosh.com/) सर्वांना मुक्तपणे पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी ’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने नुकताच महाजालावर उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अशी संकेतस्थळे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने पुनःपुन्हा भेट द्यावी अशी तीर्थस्थळेच होत. त्यानिमित्ताने खालील माहितीपर लेख प्रसिद्ध करीत आहोत.
गांधीहत्या की गांधीवध? (संस्कृत व्याकरणदृष्ट्या विश्लेषण)
एकेकाळी महात्मा गांधींच्या खुनाच्या बाबतीत ‘गांधीवध’ हा शब्द वापरावा की ‘गांधीहत्या’, यावर मोठा वाद झाला होत्या. विसाव्या शतकातील सत्तरीच्या दशकाच्या उत्तरभागात ’गांधीहत्या आणि मी’ हे श्री० गोपाळ गोडसेंचे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर आणि विशेषतः पुढे नव्वदीच्या दशकाच्या उत्तरभागात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक रंगमंचावर आले तेव्हा तथाकथित हिंदुत्ववादी मंडळी आणि तथाकथित गांधीवादी मंडळी यांच्यामध्ये या विषयावर त्वेषपूर्ण चर्चा झाल्या. परन्तु आजही हा प्रश्न विद्वानांनी निकालात काढलेला दिसत नाही….
केतकर-पिडीयाचे (महाराष्ट्रीय ज्ञानकोश) भारतीयांना वावडे, विकिपीडिया मात्र जोरात ! (ले० मंगेश नाबर)
दुर्गाबाई भागवत म्हणाल्य़ा, “मला वाटतं, मुळात जर तुमच्याकडे समाजाला देण्यासाठी सशक्त असं जीवनमूल्य असेल, त्याच्यावर तुमचा स्वतःचा गाढ विश्वास असेल; तर तेवढी हिम्मतही आपोआपच येत असेल. यायला हवी. पण आपल्याकडे ते सगळंच कमी पडतं. काही तुरळक उदाहरणं आहेत. केतकरांच उदाहरण घे. आयुष्यभर आपला विचार, समाजहिताचा, त्यांनी मांडला. पण शेवटी अन्नान्न दशा होऊन तो माणूस मरतो ! त्यांनी ती किंमत मोजली.”
“मी एरवी गांधींची भक्त; पण त्यांचं जिथं चुकलं तिथ सांगितलंच पाहिजे. भलत्या ठिकाणी भक्ती काय कामाची ? तेव्हा एशियाटिक लायब्ररीचे एक सभासद प्रभावळकर म्हणून होते. आजचे नाट्य कलावंत दिलीप प्रभावळकर यांचे वडील. ते मला म्हणाले होते, ” बाई, तुम्ही गांधीनाही सोडलं नाहीत…! “
उत्सवी मग्न राजा.. आणि प्रजाही! (ले० गिरीश कुबेर, दै० लोकसत्ता)
प्रत्येक राष्ट्राच्या इतिहासात एक काळ असा येतो की, त्यावेळी जनतेचं वास्तवाचं भान सुटतं आणि ती गुलाबी आभासालाच वास्तव मानू लागते. समाजमनाला एकूणच ग्लानी येते. जनतेचं हे असं वास्तवाचं भान सुटावं अशी प्रत्येक राज्यकर्त्यांचीच इच्छा असते. अशा काळात करमणुकीला अतोनात महत्त्व येतं. कला आणि करमणूक यातील भेद कळायची कुवतही समाज हरवून बसतो.
क्रेडिट कार्डच्या व्यवहारावर अधिशुल्क वसूल करणे बेकायदा (ले० सलील कुळकर्णी, लोकसत्ता, ४ एप्रिल २०११)
४ एप्रिल २०११. आज गुढी पाडवा. मराठीजनांचा नववर्षारंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त. या शुभदिनी आपल्यापैकी काही जण सोने-दागिने खरेदी करतील किंवा घरात काही मौल्यवान चीजवस्तू खरेदी करतील. अशा वेळी मोठी रक्कम तर आपण खिशात घेऊन फिरत नाही. आणि त्यामुळे पैसे भरताना जर आपण क्रेडिट कार्डाचा (पतपत्रिकेचा) वापर केला तर तो व्यापारी बेकायदेशीररीत्या आपल्याकडून व्यवहाराच्या किंमतीच्या दोन-चार टक्के अधिशुल्क वसूल करण्याची शक्यता आहे. त्या संबंधात खालील लेख अवश्य वाचा.
आत्महत्या आणि आत्मार्पण (ले० स्वातंत्र्यवीर वि० दा० सावरकर)
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी प्रायोपवेशनानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी आत्मार्पण केले. त्याआधी त्यामागची भूमिका विशद करणारा लेख त्यांनी लिहिला होता. स्वा० सावरकरांच्या लेखातील अंश लोकसत्तेने प्रसिद्ध केला आहे.
सावरकरांची प्रत्येक कृती ही विचारपूर्वक केलेली आणि तर्काधिष्ठित असे. कधीकधी त्यांच्या कृती व विचारांमागील त्यांची भूमिका व त्यांची योग्यता सामान्य माणसाला लगेच लक्षातही येत नसे. म्हणूनच त्यांचा आत्मार्पण करण्याचा बेत निश्चित झाल्यावर तो प्रत्यक्ष कृतीत आणण्याआधी त्यांनी हा लेख प्रसिद्ध केला असावा. त्यावेळी हा लेख वाचून सावरकरांच्या मनातील ह्या योजनेची किती जणांना चाहूल लागली होती, कोण जाणे.
Don’t miss the corruption in our everyday life (Francois Gautier, DNA Analysis, Feb. 18, 2011)
DO READ the analysis of the present Indian Society and its psyche made by a foreigner. Most of us would agree (at least in theory, if not in practice) with his analysis of the ’Modern Indian Society’. It talks about the corruption in our actions as well as thoughts and principles and how it has pervaded all the spheres of our life including cricket, sports, advertisements, Bollywood, industry, taxation and many other matters of our day to day life. Just read on…
मुंबईतील गिरणी कामगाराची उध्वस्त धर्मशाळा
मुंबईतील लालबाग-परळ भागातील गिरणगाव हा होता मुंबईतील मराठी संस्कृतीचा शेवटचा मोठा गड. पण आमच्या स्वार्थी, लोभी व बेईमान राजकारण्यांनी (सर्वच पक्षातील) गिरणीमालक, बांधकाम व्यावसायिक आणि परप्रांतीय धनिक यांना फितूर होऊन तो शेवटचा गडही मराठा स्वराज्यातून काढून प्रतिपक्षाच्या हवाली केला.
“शेवटच्या गिरणी कामगाराचे पुनर्वसन होईपर्यंत कुठल्याही गिरणीची एक वीटही काढू देणार नाही” अशा वल्गना करणार्या राजकारण्यांनी अनेक गिरण्या जमीनदोस्त होऊन त्यांच्या जागी अनेक इमारती व मनोरे बनले तरी अजुनही गिरणीकामगारांच्या घरांसाठी एक वीटही रचलेली नाही. गिरणीकामगाराची कर्मभूमी उध्वस्त करून त्या जागेवर धनदांडग्या परप्रांतीय पाहुण्यांसाठी धर्मशाळा बांधल्या गेल्या.
कोकणातील पर्यावरण आणि लोकभावनांकडे अक्षम्य दुर्लक्ष (डॉ० माधवराव गाडगीळ समिती)
इतर भागांच्या विकासाचे ओझे कोकणाने का घ्यायचे, असा प्रश्नही समितीने विचारला आहे. “रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना दर वर्षी केवळ १८० मेगावॉट विजेची गरज आहे. सध्या येथील सर्व ऊर्जा प्रकल्पांतील एकूण उत्पादन ४५४३ मेगावॉट आहे. हे जिल्हे त्यांना पुरणारी वीज उत्पादित करीत असून, उरलेली वीज देशासाठी देत आहेत. मुंबईला आणखी विजेची गरज असेल, तर मलबार हिल भागात कोळशावर आधारित ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे एखाद्याने सुचविले, तर त्यात गैर काय?” असेही समितीने म्हटले आहे.
होय, मुंबई आम्ही विकत घेतलीय! (ले० प्रतिमा जोशी, म०टा० ५ मे २०१०)
पण याच महाराष्ट्राने मुंबईसह स्वतंत्र राज्य म्हणून जन्माला येण्यापोटी गुजरातला चक्क कोट्यवधी रुपये मोजले आहेत, हे फारच कमीजणांच्या गावी असेल.
’जन-गण-मन’ – फुललेली छाती, गोंधळलेले मन (प्रश्नकर्ता: श्री० मंदार मोडक)
“अशा प्रकारे आपल्या देशाभिमानाचे प्रतीक ठरलेले हे गीत गाताना आपल्या मनाला कधीही हा विचार फारसा शिवत नाही का की या गीताच्या निर्मितीमागचा इतिहास काय असावा? गुरूदेव रवींद्रनाथ टागोरांनी हे जयगान स्वातंत्र्यपूर्व काळात कोणत्या संदर्भात रचले असावे?”
“देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ‘वंदे मातरम्’ हे गीतच मुख्यतः स्वातंत्र्याचा मंत्र म्हणून सर्वमुखी झालेले असतानाही त्या गीताला पुढे स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत म्हणून का स्वीकारले गेले नाही असा प्रश्न मनात येऊन त्याविषयी खेद वाटल्याशिवाय राहात नाही.”
An empress of India in new clothes (by John MacLithon)
“But the moment I stepped in India I felt that there was nothing much that I could give to India, rather it was India which was bestowing me.”
“— but many of the institutions are crumbling in the West: two out of three marriages end in divorce, kids shoot each other, parents are not cared for in their old age, depression is rampant and Westerners are actually looking for answers elsewhere, in India notably.”
“One does not understand this craze to Westernise India at all costs, while discarding its ancient values.”
“And unlike China, it (India) always looks to the West for a solution to its problems.”
Marathi contribution to reforms ignored : Ramchandra Guha (Author of – Makers of Modern India)
Maharashtra was the crucible of political activism and social reforms from the late 19th century till the 1950s. That tradition of reform has been ignored.
The more I read and researched, I was sure Maharashtra had contributed to social and political reforms much more than any other part of the country.
पानिपताच्या मराठी पठ्ठ्याची सुवर्णझळाळी (दै० सकाळ, १५ ऑक्टोबर २०१०)
राष्ट्रकुल स्पर्धेसाठी दिल्लीला जाताना आशीर्वाद घेण्यास आलेल्या मनोजला मी सांगितलं होतं, “बेटे, अपने देशका नाम रोशन करना। सोनाही लेके घरको लौटके आना।” आणि काय सांगू, त्यानंही सुवर्णपदक मिळवून माझा आशीर्वाद खरा ठरविला…” मनोजचे यश हे मराठी मातीचेही यश आहे, असे सांगताच क्षणाचाही विलंब न लावता शेरसिंग उद्गारले, “हम लोग तो मराठाही है साब..!”
विश्वासघाताचे विस्मरण (ले० प्रा० मनोहर राईलकर)
“देशाचे तुकडे करण्याआधी माझ्या देहाचे तुकडे करा”, “Vivisect me before you vivisect India” असं निग्रहपूर्वक म्हणणार्या गांधीजींनी हा विश्वासघात जड मनानं स्वीकारला. पण हा विश्वासघात कुणी केला? ह्या प्रश्नाचं उत्तरही कॉंग्रेसचे मुख्य सचिव दिग्विजयसिंग यांनी शोधावं.
Lord Macaulay’s Psychology: The Root Cause behind British India’s Baneful Education System
“We must, at present, do our best to form a class, who may be interpreters between us and the millions whom we govern; a class of persons, Indian in blood and colour, but English in taste, in opinions, in morals, and in intellect.” – Said Lord Macaulay 175 years ago. Unfortunately, Macaulay’s Legacy in India still continues.
महाराष्ट्र राज्यानं आम्हाला काय दिलं? (ले० प्रा० मनोहर राईलकर)
“माझ्या मनातला, वर उल्लेखिलेला तो प्रश्न मला असं सांगतोय की गुजराथ आणि महाराष्ट्र ह्या दोन राज्यांच्या प्रगतीची तुलना करून पाहा. काय आढळतं? अगदी पहिली बाब म्हणजे, तुलना करण्याइतपत तरी महाराष्ट्राची अवस्था आहे का? गुजरातनं जी प्रगती केली आहे, तिच्या जवळपास जाण्याची तरी महाराष्ट्राची पात्रता आहे का? ऑलिंपिकमध्ये भाग घेण्याकरतासुध्दा किमान पात्रता असावी लागते. नाही तर हसंच होण्याचा संभव राहतो, असं म्हणतात.”
Liberties Liberhan Took – लिबरहॅन यांचा स्वैराचार?? (ले० चंदन मित्रा – सण्डे पायोनियर)
दिनांक २९ नोव्हेंबर २००९ दिवशीच्या सण्डे पायोनियरमधील हा एक उत्तम, चिंतनीय लेख. हा लेख काही वेगळेच पैलू उघडून दाखवतो आणि मग देशाच्या खजिन्यातील काही शे कोटी खर्च करून सत्तारूढ पक्षाने स्वतःच्या राजकीय सोयीशिवाय काय साधले असा प्रश्न पडतो.
संगणित: संगीतातील स्वरांचे गणित (ले० प्रा० मनोहर राईलकर)
संगीताची मुळीच आवड नाही अशी व्यक्ती आज सापडणे कठीण. आपल्यासारख्या सामान्य रसिकांना संगीताची आवड असते आणि त्यातील अनेक गूढ, तांत्रिक नियमांबद्दल कुतूहलही असते. ‘सा’ म्हणजे काय? संवादिनीच्या (बाजाच्या पेटीच्या) कुठल्याही पट्टीला ‘सा’ म्हणता येईल असं म्हणतात, ते कसं? वरचा सा, खालचा ‘सा’ म्हणजे काय? एखादा गायक ‘काळी एक’ या पट्टीमध्ये गातो तर एखादी गायिका ‘काळी तीन’ या पट्टीत गाते; असे कधीकधी ऐकू येते, त्याचा अर्थ काय? पाश्चात्य स्वर व भारतीय स्वर यांमध्ये साम्य व भेद कोणते? असे अनेक प्रश्न वेळोवेळी आपल्याला पडत असतात, पण आपल्याला ते समजण्यातले नाही असा विचार करून आपण ते कुतूहल तसंच दडपून टाकतो. पण संगीतशास्त्रातील स्वरांच्या गणिताबद्दलच्या खालील लेखामध्ये या सर्व प्रश्नांची उत्तरे सापडतील.