पुष्कळांना गोहत्याबंदीच्या मागणीमागं काही तरी भाबडेपणा असला पाहिजे असं वाटत असतं. आणि ती मागणी हिंदुत्वनिष्ठांकडून आल्यानं स्वतःला प्रतिष्ठित मानणारे काही डुड्ढाचार्य/र्या तिची टिंगलटवाळी करीतही असतात. त्यामागं काही तरी राजकीय हेतू असणार, अशीही शंका काहींना असते. काहींना हा व्यक्तिस्वातंत्र्यावरील घाला वाटतो. गोमांस निर्यातीतून मिळणारा पैसा घटेल, याचीही चिंता कित्येकजण, व्यक्त करीत असतात. काहींना ती हिंदूंची अंधश्रद्धा वाटते. त्याकरता त्यांना स्वा. सावरकरांच्या मतांचा आसरा घेण्यालाही लाज वाटत नाही. प्रस्तुत प्रश्नाचा विचार धार्मिक दृष्टीनं न करता आर्थिक दृष्टीनं केला पाहिज, असाही कैक जणांचा आग्रह असतो. मुसलमानांचा पुळका येणारे हिंदू तर आपल्या देशात पोत्यानं आहेत. समाजवादी, कम्यूनिस्ट, काँग्रेस, पुरोगामी. म्हणून तर आता ह्या दाव्याच्या निमित्तानं स्पष्ट झालेली आर्थिक बाजूच आपण पाहू म्हणजे झालं.
Category: ०४.१ सविस्तर वृत्त
मराठीतला पहिला संपूर्ण महाराष्ट्रीय ज्ञानकोश आता महाजालावर
मराठीमधील पहिला ज्ञानकोश (विश्वकोश) डॉ० श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी सुमारे ८५ वर्षांपूर्वी जिद्दीने १२-१३ वर्षे झटून एकहाती तयार केला. त्यातील माहिती आजही अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी अशीच आहे. मराठीमध्ये जागतिक दर्जाचा ज्ञानकोश आणण्यासाठी आपल्या व्यक्तिगत, कौटुंबिक, आर्थिक आणि शारीरिक बाबींची पर्वा न करता ह्या उपक्रमासाठी आपले सर्वस्व पणाला लावून शेवटी केतकर वयाच्या केवळ ५३ व्या वर्षी पुण्याच्या सार्वजनिक ससून रुग्णालयात एखाद्या अतिसामान्य दरिद्री माणसाप्रमाणे मृत्यू पावले. अशा अलौकिक पुरुषाचे मराठी माणसावर मोठे ऋण आहेत. मराठी माणसाला त्यांचे विस्मरण होणे हा कृतघ्नपणा ठरेल. केतकरांचा महाराष्ट्रीय ज्ञानकोश (http://ketkardnyankosh.com/) सर्वांना मुक्तपणे पाहण्यासाठी, अभ्यासण्यासाठी ’यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने नुकताच महाजालावर उपलब्ध करून दिला आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे. अशी संकेतस्थळे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाने पुनःपुन्हा भेट द्यावी अशी तीर्थस्थळेच होत. त्यानिमित्ताने खालील माहितीपर लेख प्रसिद्ध करीत आहोत.
पोलिस खात्यातील नोकरीसाठी मराठीऐवजी उर्दूचा पर्याय (डीएनए, १३ फेब्रुवारी २०११)
पोलिसांसारख्या राज्यातील विविध ठिकाणच्या विशेषतः गावोगावच्या सामान्य माणसांशी सतत संबंध येणार्या नोकरीसाठी राज्याची भाषा जाणणे आवश्यक नाही का?
महाराष्ट्रात मराठी भाषेचे व मराठीमाणसाचे महत्त्व कमी करणे तसेच महाराष्ट्रात पूर्वीपासून राहणार्या मराठी मुसलमानांच्या मनात मराठीबद्दल दुजाभाव निर्माण करणे असा हा मराठीद्वेष्ट्यांचा दुहेरी डाव आपण सर्वांनी एकत्रितपणे हाणून पाडायला हवा.
ग्राहक तक्रार आता फक्त ‘मराठीतच’ (दै० म०टा० आणि टाइम्स, २९ सप्टें० २०१०)
महाराष्ट्र टाइम्सची “या नियमामुळे मराठी-भाषिक जनतेला फायदा होणार आहे” आणि “मराठीचं ज्ञान असणं तुम्हाला बाकी कोणत्याही मुद्यापेक्षा फायदेशीर ठरु शकतं” ही विधाने तसेच टाइम्सची “rule is likely to benefit lakhs of the Marathi- speaking community” आणि “knowledge of Marathi may prove more crucial than any single other factor” ही विधाने म्हणजे कहर आहे. महाराष्ट्रात राहणार्या प्रत्येक व्यक्तीसाठी राज्यभाषा मराठीच असते हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या देशातील किंवा राज्यातील विविध सोयींचा फायदा घेताना तेथील भाषेचा व संस्कृतीचा मान न राखणे हे जगात कुठेच खपवून घेतले जाणार नाही.
चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य स्थान मिळण्यासाठी राज्यपालांना शिष्टमंडळाची भेट (वृत्त: पंजाब न्यूजलाईन नेटवर्क)
केंद्रशासित चंदीगढ प्रदेशात पंजाबी भाषेला तिचे योग्य व कायदेशीर स्थान मिळवून देण्यासाठी पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल ह्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. चंदीगढमध्ये पंजाबी भाषेला योग्य कायदेशीर स्थान मिळवून देणे, चंदीगढमधील शाळांमध्ये १ली ते १०वीच्या वर्गांत पंजाबी भाषेचे शिक्षण सक्तीचे करणे, केंद्रशासनाच्या प्रशासनात ६०% नोकर्या पंजाबी अधिकार्यांना (उर्वरित ४०% हरियाणाच्या अधिकार्यांना) राखून ठेवण्याच्या संबंधातील नियमाची अंमलबजावणी करणे इत्यादी मागण्यांसाठी केंद्रशासित चंदीगढ शहरातील परिस्थितीबद्दल पंजाब विधानसभेने एकमताने अशा प्रकारचा ठराव केला व त्याच्या अंमलबजावणीसाठी गळ घालण्यासाठी वरीलप्रमाणे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यास गेले. राज्यपाल श्री० शिवराज पाटील ह्यांनी त्यांना न्याय्य अधिकार मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
’मायबोली मराठी भाषा दिन’ व ’मायबोली मराठी सप्ताह’ साजरा करण्यासाठी कार्यक्रम (वृत्त व आवाहन)
ज्ञानपीठ पारितोषिक विजेते श्रेष्ठ मराठी साहित्यिक वि० वा० शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस ’मायबोली मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. शिवाय १९९९ वर्षापासून युनेस्को या जागतिक संस्थेने २१ फेब्रुवारी हा दिवस ’जागतिक मातृभाषा दिन’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे. ह्या दोन्ही सुदिनांचे औचित्य साधून विविध मराठीप्रेमी संस्थांनी २१ ते २७ फेब्रुवारी हा आठवडा ’मायबोली मराठी सप्ताह’ म्हणून साजरा करण्याचे य़ोजले आहे. हा आठवडा ज्या दोन महत्त्वाच्या दिवसांना जोडतो ते दोन्ही दिवस आपल्या प्रिय मायबोलीच्या सन्मानाचे दिवस आहेत हा दुग्धशर्करा योगच नव्हे काय?
खासगी शिक्षण संस्थाही माहिती अधिकाराच्या कक्षेत (वृत्त: दै० सकाळ, १२ फेब्रु० २०१०)
आज उच्च शिक्षणाचे अभ्यासक्रम राबवणार्या महाराष्ट्रातील कुठल्याही खासगी शिक्षणसंस्थेच्या विद्यार्थ्यांच्या यादीवर दृष्टी टाकल्यास त्यात बेकायदेशीरपणे ५० ते ८० टक्क्यांपर्यंतच्या प्रमाणातील मुले महाराष्ट्राबाहेरील आहेत हे सहजच समजून येते. यावर कदाचित आता अंकुश ठेवता येईल.
मराठी अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण (संगीतकार कौशल इनामदार)
मराठी+एकजुटीच्या सर्व बांधवांना प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार याच्या तर्फे मराठीच्या अभिमानगीताच्या प्रकाशनाचे आमंत्रण.
गृहमंत्रालयही म्हणते हिदी राष्ट्रभाषा नव्हे! (वृत्त: दै० लोकमत, १४ जाने० २०१०)
हिदी ही राष्ट्रभाषा असल्याची कोणतीही घटनात्मक तरतूद राज्यघटनेत नाही, असे स्पष्टीकरण खुद्द गृहमंत्रालयानेच दिले आहे. पुण्यातील मराठी अभ्यास केंद्राचे सलील कुलकर्णी यांनी गृहमंत्रालयाच्या राजभाषा भवनकडे माहिती अधिकारात अर्ज करून ही माहिती प्राप्त केली आहे.
पन्नास वर्षानंतरही राज्यात शिक्षणविषयक धोरणाचा खो-खो चालूच !! (विविध वृत्ते)
पुढील तीन वृत्ते वाचा.
१. वृत्त दि० १२ जानेवारी २०१०: मराठी शाळांसाठीचा मास्टर प्लॅन सहा महिन्यांत (दै० सकाळ – प्रेषक: श्री० विजय पाध्ये)
(अमृतमंथन-मराठी शाळांचा मास्टर प्लॅन_Sakal_120110)
२. वृत्त दि० १२ जानेवारी २०१०: मराठी माध्यमाच्या शाळांसाठी राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच मराठीची गळचेपी – रामनाथ मोते (दै० सकाळ)
(अमृतमंथन-राज्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच मराठीची गळचेपी_Sakal_120110)
३. वृत्त दि० ०८ जुलै २००६: उच्च न्यायालयाने वर्ष २००१ मध्ये दिलेल्या आदेशानुसार मास्टर प्लॅन अजुनही तयार नाही (दै० लोकसत्ता – प्रेषक श्री० विजय पाध्ये)
(अमृतमंथन-शाळामंजुरीचा निर्णय रद्द_Loksatta_080706)
.
तीनही वृत्ते नीट वाचा. त्यावरून खालील बाबी स्पष्ट होतात.
“मराठी शाळा म्हणजे सरकारवर ओझे” आणि “शासकीय व्यवहारात १००% मराठी” (वृत्त: दै० सामना, ६ जाने० २०१०)
५ जानेवारी २०१० या दिवशी महाराष्ट्र शासनाने एकाच दिवशी दोन विधाने केली – एक कडू, दुसरे गोड. अर्थात सत्य सहसा कटु असण्याचीच शक्यता अधिक असल्यामुळे या दोन विधानांपैकी कडू विधान सत्य ठरण्याची व गोड विधान केवळ नावापुरते निघण्याची शक्यता अधिक वाटते.
Read More »
मुंबई महानगरीच्या अभिमानगीताच्या निर्मितीमध्ये मराठीची उपेक्षा (संपादकांस पत्र – ले० सलील कुळकर्णी)
मुंबई पोलिस खात्याने मुंबई महानगराचे अभिमानगीत (city anthem) तयार करण्यासाठी सोनू निगम यांना पाचारण केले आहे अशी बातमी ऐकली. हे गीत २६/११ च्या हत्याकांडात जीव गमावलेल्या शेकडो व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने तयार केले जाणार आहे. मुंबई पोलिसांनी करू घातलेले हे गीत अर्थातच मराठीत नाही तर हिंदी भाषेत असेल आणि असेल अमराठी गायकांनी गायलेले आणि अर्थातच अमराठी भाषकांसाठी.
मराठी टिकेल काय? (अग्रलेख: दै० सामना, दि० १० डिसें. २००९)
दिनांक ११ डिसेंबर २००९ च्या ’दैनिक सामना’चा वरील शीर्षकाचा अग्रलेख वाचनीय आहे. अग्रलेखातील राजकीय छटा जरी दृष्टीआड केली तरी त्यात मांडलेले वास्तव हे एक भयानक सत्य आहे. एकीकडे नवीन मराठी शाळांना अनुमती नाकारायची व दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या शाळांच्या विविध मार्गांनी मुसक्या बांधून त्यांचा दर्जा कसा खालावेल व त्यांच्यापासून मराठी माणूस दूर जाऊन तो इंग्रजी शाळांकडे कसा वळेल यासाठी योजनाबद्ध पद्धतीने प्रयत्न करायचे हेच शासनाचे शिक्षणविषयक अलिखित धोरण आहे.
मराठीच्या अभिमानगीताची निर्मिती – लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी (वृत्त आणि आवाहन)
कौशल इनामदार या तरुण व उभरत्या अशा आपल्या संगीतकार-मित्राने आपल्या मराठी भाषेला एक अभिमानगीत देण्याचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी त्याने मराठीतील श्रेष्ठ कवी सुरेश भटांची ’लाभले अम्हांस भाग्य’ ही अत्युत्तम, मराठी माणसाच्या स्वभाषा व स्वसंस्कृती बद्दलच्या भावना अचूकपणे मांडणारी, आपल्या सर्वांची आवडती व वाचताना आपल्याला मराठीच्या अभिमानाने बेभान करणारी कविता त्यांनी निवडली आहे. या कवितेला उत्तम संगीताचा साज लेववून तिला मराठी अभिमानगीत म्हणून जगापुढे सादर करण्याचा कौशलचा मनोदय आहे.
मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे अभिनंदन ! (वृत्त: प्रेषक सुशांत देवळेकर)
मराठी देवनागरी वर्णमालेत सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या निर्णयाबद्दल शासनाचे आभार व अभिनंदन !
संबंधित सुधारणा करण्यासाठी घेतलेल्या राज्यशासनाच्या निर्णयाची प्रत सादर करीत आहोत.
महाराष्ट्र शासनाचे गुजराथीला १ कोटी आणि मराठीला २५ लाख? (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स, मुंबई, दि० ३ डिसें० २००९)
दिनांक ३ डिसेंबर २००९च्या महाराष्ट्र टाईम्समधील बातमीवरून असे कळते की नेहमीच ’माय मरो आणि मावशी जगो’ असे धोरण पाळणारे आपले महाराष्ट्र राज्यशासन मराठी साहित्य सम्मेलनास २५ लाखाचे अनुदान देत असे; पण गुजरात साहित्य अकादमीस मात्र ३५ लाख देत असे. आणि आता आयजीच्या जिवावर बायजी उदार होऊन गु०सा०अ०ची अनुदानाची रक्कम वाढवून तिला तब्बल १ कोटीचे अनुदान देण्याचे राज्य शासनाने ठरवले आहे. याला काय म्हणावे? शब्दच सुचत नाहीत. %@&#%#**…. !!!
मराठीसाठी अशीही लढाई (वृत्त: दै० सकाळ, पुणे, दि० ३ डिसें० २००९)
मराठी भाषकच आपल्या हक्कांविषयी इतके उदासिन आहेत की त्यांना गृहीत धरणे अगदी सोपे जाते. पण थोडी जागरूकता दाखवली तर काय किमया घडू शकते, याचा एक प्रेरक अनुभव…
मोल्स्वर्थकृत मराठी-इंग्रजी शब्दकोश आता सीडी आवृत्तीतून उपलब्ध (वृत्त: दै० महाराष्ट्र टाईम्स)
प्रिय मराठीप्रेमी मित्रांनो,
आजच्या (१५ सप्टेंबर २००९ च्या) म०टा० मध्ये खालील बातमी आली आहे, ती आपल्या माहितीसाठी देत आहे.